मराठी असे आमची मायबोली हे फक्त म्हणण्यापुरतं न राहता,
ते आत्मसात करायला हवं. मराठी भाषेची प्रगल्भता प्रत्येकाला
अनुभवता यावी, तसेच भाषेचे शुद्ध विचार, वाक्प्रचार आणि संत
महंतांनी लिहिलेल्या ओव्या मानवी जीवनाला किती उपकारक आहेत,
आणि त्यामुळे आमची मराठी भाषा कशी समृद्ध झाली आहे हे व्यक्त
करण्यासाठी गुरुकुल परिवार दरवर्षी मराठी निबंध स्पर्धेचे आयोजन
करतो. शालेय विद्यार्थ्यांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत विविध गटात
या स्पर्धा घेतल्या जातात आणि अनेक स्पर्धक आपले उच्च विचार
मराठी भाषेत सादर करतात.